ऑगस्ट महिना संपत आला होता , पूर्णपणे पाऊस संपायचा आत कुठल्यातरी जबरदस्त ट्रेक ला जाऊन यायचे असे वाटत होते. माझा मित्र आकाश, ज्याच्यासोबत मी नेहमी ट्रेक ला जातो, त्यानेसुद्धा मला सांगून ठेवले होते कि कधीही प्लॅन होईल तू फक्त रेडी राहा. आमच्यासोबत आमचे अजून मित्र ट्रेक साठी रेडी होते. ते पहिल्यांदाच ट्रेक ला येणार होते. खोपोलीहून योगेश सुद्धा जॉईन होणार होता. आकाश ने व्हाट्सअप ग्रुप वैगेरे बनवला. ग्रुप वर बरीच चर्चा रंगली. बहुतेक जणांना कळसुबाई पीक ट्रेक करायचा होता. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिखर असल्याने प्रत्येक नवीन ट्रेकर ला आधी आठवतो तो कळसुबाई. पण शेवटी आकाश आमचा ग्रुप लीडर असल्याने तो जिथे सांगेल तिथे जाणे भाग होते. योगेश आणि आकाश च्या शब्दाबाहेर जाण्याचा प्रश्नच उठत नाही . शेवटी आकाश ने मुरबाड मधील गोरखगड चा प्लॅन निवडला. योगेश आणि आकाश एक दोनदा गोरखगड ला जाऊन आले होते त्यामुळे आम्हाला पूर्ण गायडन्स मिळणार हि खात्री होती. ऑगस्ट महिन्याचा शेवटचा शनिवार आणि रविवार जायचे असे सर्वानुमते ठरले. सुरुवातीला १५ जणांचा ग्रुप आता ६-७ जणांचा राहिला. हे तर नेहमीचाच. गोरखगड...